Skip to main content

Posts

महाराष्ट्राचे आराध्य दैवत

आनंदाने नांदत असलेल्या राज्यावर, अचानक सैतानांची टोळी आली । मंदिरं सारी फोडून टाकली, अब्रू स्त्रियांची धुळीला लावली ।। शुक्ल पक्षातील तृतीयेला, एका बालकाचा जन्म झाला । जणू रक्षण कराया ह्या स्वराज्याचं, शिवनेरीवर भगवंत अवतरला ।। पुढे थोडा मोठा झाल्यावर, दादोजींच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले । लहानपणातच शिकता शिकता, हिंदवी स्वराज्याचे धोरण आखले ।। ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या शुभदिनी, रायरेश्वरावर सभा भरवली । वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ।। लगेच मुघलांच्या अत्याचारातून, पहिल्या गडाला मुक्त केले । मोठ्या शौर्याने तोरणा जिंकून, स्वराज्याचे तोरण बांधले ।। परकीयांच्या तावडीतून मुक्त होऊन, पुन्हा फडफडू लागला भगवा ।। शत्रूच्या सैन्याचा नाश करायला, मोठ्या युक्तीने आखला गनिमी कावा ।। मात्र अशीच लढाई लढता, पुरंदरी मुरारबाजी कोसळला । अन मिर्झाराजा जयसिंगासह, २३ किल्ल्यांचा तह झाला ।। तहातले गडकिल्ले सोडवण्यासाठी, नवी फौज उभारण्यात आली । मुलाचं लग्न बाजूला ठेवून, तानाजीने प्राणाची आहुती ...
Recent posts

वाल्याचा वाल्मिकी

लुबाडत असे तो सर्वांना दावूनी मारण्याची भीती  अखंड पापाचा असे धनी तो अतिशय निकृष्ठ अशी त्याची नीती  अशीच एकदा वाट आडविली पण निघाले मात्र थोर ऋषि मुनी गळ्यात वीणा हातात चिपळ्या आणि नारायणाची भक्ती सदैव मनी नारायण नारायण म्हणत म्हणत त्यांनी करून दिली जाणीव पापाची दुष्ट अश्या त्या नाराधाम्याला ओळख करून दिली रामनामाची आले डोळे दाटून पश्चातापाने तोंडातून एक शब्द देखील फुटेना आपण साठवून ठेवलेल्या ह्या पापाचा त्याला साधा विचार देखील करवेना लगेच मुनींना करून नमस्कार नामजप त्याने सुरू केला १२ वर्षांच्या तपश्चर्येअंती त्याच्या भक्तीला देव प्रसन्न पावला काय जादू त्या दोन अक्षरांची ज्यांनी वाल्याला वाल्मिकी बनवले पुढे जाऊन ह्याच वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास भाग पाडले

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय ।। धृ ।। मोठालं संकट आलंय दारी देवा तूच आता यातून तारी करी किरपा त्यांच्या बुद्धीवरी ज्यांना बाहेर पडायची खाज हाय ।। १।। डाक्टर लढत हायत उपचार करूनि पोलीस बी हायत उभे काठ्या रोखुनि तरी कशापाय फिरता इतका हट्ट धरूनि समदं तुमच्याच रक्षनासाठी चाललेलं हाय ।। २ ।। सरकारनं लोकडाऊन वाढवला हाय रोग जिकडं तिकडं पसरतो हाय आकडा बी दिसनदिस वाढतो हाय पन तुम्हांसनी घरी बसाया जमत न्हाय ।। ३ ।। जीवाची पर्वा कदाचित नसल तुम्हांसनी पन कुटुंबाचा जीव टांगणीला लावूनी नका भटकू बाहेर असं खुळ्यावानी अजून बी येळ गेलेली न्हाय ।। ४ ।। #घरी_रहा #सुरक्षित_रहा 🙏🙏

रोजच्या ह्या धगधगत्या जीवनाचक्रात माझी शाळा मला आठवत नाही...

१५ जून २००४ - शाळेचा तो पहिला दिवस... इतरांसारखाच मी देखील पहिल्यांदा रडत रडतच शाळेत पोहोचलो आईच्या पदराने नाक डोळे पुसत शाळेच्या बाकावर जाऊन बसलो पण कोण जाणे शाळेच्या त्या बाकाची जादूच काही निराळी होती जणू त्या बाकाने पुढची १० वर्षांची गाठ तेंव्हाच हळूच बांधली होती शाळेतल्या त्या ठरलेल्या बाकावरील गोंधळ आज देखील पाहायला मिळतो फक्त फरक मात्र त्या बकाऐवजी आज ट्रेनच्या सीटवर दिसून येतो ट्रेनच्या खिडकीबाहेरचा निसर्ग बघण्यास देखील आता मला सवड नाही रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही. हळू हळू शिक्षकांचे धपाटे खात थोडा मोठा झालो गुडघ्यापर्यंतच्या त्या हाफ चड्डीतून आता मात्र फुलपँटीत आलो फुलपँटीत आल्याबरोबर हळूच शिंग देखील फुटू लागली मित्र मैत्रिणी सवंगाड्यांसोबत आता एक गिर्लफ्रेंडसुद्धा सोबत आली तिला गुपचूप लिहायची ती पत्र तर मी आज देखील रोज लिहितो फक्त आज ते ऑफिसच्या कामासाठी ई-मेल वरून क्लायंटला पाठवतो  आता ऑफिस आणि डेली रुटीन ह्यापलीकडे दुसरं काही दिसत नाही रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही. बघता बघता दहा वर्षांची ही टूर आता संपत आली उगवलेली...

काय सांगशील ज्ञानदा

कालच सांगत होती मंदा कधी नाही ते आमचे हे एबीपी माझा लावून बसतात यंदा काय सांगशील ज्ञानदा सारी दुनिया झाली एबीपी माझा ची फिदा लोकमत, साम, २४तास सर्वांचाच खचून गेलाय धंदा काय सांगशील ज्ञानदा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सुद्धा एकच उठून दिसतेय सदा सर्वदा काय सांगशील ज्ञानदा सगळ्यात महत्त्वाचं👇 जोक मिम्स करताना आपली पातळी मात्र ओलांडू नका महाराजांच्या स्त्रीसन्मानाच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नका वाटल्यास जिओ टीव्ही वर बघा तोच कार्यक्रम पुन्हा एकदा काय सांगशील ज्ञानदा

कोरोनाला लढा

दिवस कुठे चांगले चालले होते, त्यात तुझी ही भर पडली । कोण जाणे कोणाची ही पीडा आली, जी तुझी लागण आमच्या देशाला झाली ।। नक्की कोणत्या दैत्याचं रूप तुझं, ज्याने उडविली आमच्या गालावरची खळी । मी तर म्हणतो त्या दैत्याहुनी महाक्रूर तू, जिथे जन्मला तिथेच घेतले ३० हजार बळी ।। तसं आम्हाला इतिहासच लाभलाय शूरवीरांचा, म्हणून तुझा सर्वात उत्तम मुकाबला तर आम्हीच केला । इतक्या तावातावाने चवताळून आलास खरा, पण आम्ही तर तुझ्या क्रूरपणाचाही फायदा घेतला ।। आमच्यावर हसणारी ती फॉरेनर लोकं, आज पुन्हा राम राम करू लागली। तुझ्या ह्या क्रूरपणामुळेच आज, आमची संस्कृती जगभरात पोहोचू लागली।। अरे ३३ कोटी देवांची भूमी आहे ही, इथे तुझं वर्चस्व फार वेळ नाही टिकणार । मास्क, सॅनिटाईझर आणि कर्फ्युला सोबत घेऊन, आम्ही सुरक्षितपणे तुझ्याशी लढत राहणार ।।

कोल्हापूर महापूर

बाकी काही मागणं नाही देवा येशील तेंव्हा सर्वप्रथम कोल्हापुरात पदार्पण कर, माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर। सर्वांच्या घरी सारखाच नटून थटून तू येतोस खरा, पण यावर्षी सर्वात आधी त्यांच्या मनोकामना पूर्ण कर। मला माहित आहे देवा जसा भाव तसा तुझी कृपा आहे, पण भक्ताचं काही चुकलं असेल तरी त्यांना तू माफ कर। रोज त्यांच्या यातना बघून जीव कासावीस होतोय सर्वांचा, करुणामय आहेस तू तर माझ्या बांधवांवरसुद्धा करुणा कर। मान्य आहे मला देवा तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवत आहे, पण बाकी काही मागणं नाही देवा येशील तेंव्हा सर्वप्रथम कोल्हापुरात पदार्पण कर, माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर।