Skip to main content

About

अवगत झालेल्या कलेच्या माध्यमातून शक्य तितका मराठी भाषेचा विकास करण्यासाठीचे काही प्रयत्न.


आजकाल सर्वच लहान मुलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असतात. एक जागतिक भाषा म्हणून इंग्रजी येणे फार आवश्यक आहे आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमातून जर आपल्या पाल्यास शिकविले तर तो पुढे जाऊन आपले कर्तृत्व दाखवू शकतो असा सर्व पालकांचा समज आहे आणि ह्यामध्ये काहीच गैर नाही. पण अशाच वेळी आपली मातृभाषा जोपासणं हे देखील तितकच महत्त्वाचं आहे. आजकाल सर्वजण खूप चांगल्याप्रकारे इंग्रजीमध्ये बोलतात पण अश्याच वेळी आपण ज्या मातीत जन्माला आलो तेथील मातृभाषा तर विसरत नाही आहोत ना हे देखील लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. असाच मराठी भाषेत जन्म झालेला मी. शिक्षण मराठी माध्यम सेमी इंग्रजीमधून झालं. पण जसजसा कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या वातावरणात वाढू लागलो तर आपलीच मराठमोळी मुलं ज्यांना मराठी चित्रपट, मराठी गाणी ऐकायला आवडत नाहीत. मराठी लिहिता वाचता येत नाही. असे बरेच जण माझ्या दृष्टीस पडले. इतकेच नव्हे तर काही जणांना चक्क मराठी बोलायला लाज वाटते असेही काहीजण माझ्या दृष्टीस पडले. हा सर्व प्रकार पाहून खूप वाईट वाटलं. हे असंच जर चालू राहिलं तर मराठी भाषा संपुष्टात येण्यास वेळ नाही लागणार. मी वारंवार शक्य तितकं माझ्या कॉलेजमधील मित्रांना मराठी बोलण्याची सवय लावून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपल्याला अवगत झालेल्या कलेच्या माध्यमातून शक्य तितका मराठी भाषेचा विकास करण्यासाठीचे काही प्रयत्न.

Comments

Popular posts from this blog

बाप आणि पोराचं नातं

आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं... आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।। आयुष्यात कधीच एकमेकांचं पटत नसतं। पण एकमेकांशिवाय मन मात्र रमत नसतं।। भांडल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नसतं। एकदाचं भांडून झालं की मन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागतं।। चार आण्याची लायकी काढून झाल्यावर त्यांचं मन भरून जातं। आणि प्रत्त्युत्तरात त्यांचे दुर्गुण काढले नाही तर माझं मन अपूर्ण राहतं।। मनात एकमेकांबद्दल आदर असूनही  समोरासमोर दाखवायचं नसतं। पण बाहेर मात्र एकमेकांचा आदर्श ठेवून ताठ मानेने जगायचं असतं।। इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःच्या गरजांना सुळावर चढवावं लागतं। आणि ह्या कर्तव्याची परतफेड करण्यासाठी मलासुद्धा झटावं लागतं।। एकमेकांसमोर एकमेकांची निंदा करण्यातच आमचं जीवन सारं व्यर्थ जातं। मध्येच "उद्या जर निंदा करायला चेहरा हा दिसेनासा झाला तर" या विचाराने एकमेकांचं काळीज मात्र धडकत राहतं।। अरे आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।।

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय ।। धृ ।। मोठालं संकट आलंय दारी देवा तूच आता यातून तारी करी किरपा त्यांच्या बुद्धीवरी ज्यांना बाहेर पडायची खाज हाय ।। १।। डाक्टर लढत हायत उपचार करूनि पोलीस बी हायत उभे काठ्या रोखुनि तरी कशापाय फिरता इतका हट्ट धरूनि समदं तुमच्याच रक्षनासाठी चाललेलं हाय ।। २ ।। सरकारनं लोकडाऊन वाढवला हाय रोग जिकडं तिकडं पसरतो हाय आकडा बी दिसनदिस वाढतो हाय पन तुम्हांसनी घरी बसाया जमत न्हाय ।। ३ ।। जीवाची पर्वा कदाचित नसल तुम्हांसनी पन कुटुंबाचा जीव टांगणीला लावूनी नका भटकू बाहेर असं खुळ्यावानी अजून बी येळ गेलेली न्हाय ।। ४ ।। #घरी_रहा #सुरक्षित_रहा 🙏🙏

काय सांगशील ज्ञानदा

कालच सांगत होती मंदा कधी नाही ते आमचे हे एबीपी माझा लावून बसतात यंदा काय सांगशील ज्ञानदा सारी दुनिया झाली एबीपी माझा ची फिदा लोकमत, साम, २४तास सर्वांचाच खचून गेलाय धंदा काय सांगशील ज्ञानदा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सुद्धा एकच उठून दिसतेय सदा सर्वदा काय सांगशील ज्ञानदा सगळ्यात महत्त्वाचं👇 जोक मिम्स करताना आपली पातळी मात्र ओलांडू नका महाराजांच्या स्त्रीसन्मानाच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नका वाटल्यास जिओ टीव्ही वर बघा तोच कार्यक्रम पुन्हा एकदा काय सांगशील ज्ञानदा